Ajinkya Rahane – भारतीय क्रिकेटमध्ये सध्या वेगवेगळे बदल केले जात आहेत. त्याचबरोबर बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची निवड समितीदेखील बरखास्त केली आणि नव्याने समिती स्थापन करण्यासाठी इच्छुक उमेदरांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. भारतीय संघ आयसीसी स्पर्धांमध्ये वारंवार अपयशी ठरत आहे. त्यामुळे आता बीसीसीआयकडून वेगवेगळे बदल केले जात आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये भारतीय संघाचा माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे ( Ajinkya Rahane ) सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. मात्र सध्या त्याच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
#FIFAWorldCup । दीपिका पदुकोनच्या हस्ते विजेतेपदाच्या करंडकाचे अनावरण
अजिंक्यला ( Ajinkya Rahane ) त्याच्या खेळण्याच्या कौशल्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम खेळाडू मानले जात आहे. मागील काही काळात रहाणेच्या बॅटमधून धावा न निघाल्याने त्याला संघातून डच्चू देण्यात आला. त्याने ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयात विराट कोहलीच्या गैरहजेरीत संघाचे नेतृत्व करत भारताला विजय मिळवून दिला होता. आता पुन्हा एकदा त्याला भारतीय कसोटी संघात पुनरागमन करण्याची चांगली संधी मिळणार आहे.
#FIFAWorldCup । दीपिका पदुकोनच्या हस्ते विजेतेपदाच्या करंडकाचे अनावरण
आगामी काळात होणाऱ्या रणजी करंडक २०२२-२३ साठी अजिंक्याकडे ( Ajinkya Rahane ) मुंबई संघाचे कर्णधारपद असून त्याच्यासोबत सूर्यकुमार यादव देखील दिसणार आहे. त्यामुळे अजिंक्यने यंदाच्या या करंडकात दमदार कामगिरी केल्यास त्याचे संघातील पुनरागमन कोणीही टाळू शकणार नाही. त्याचबरोबर हा रणजी हंगाम त्याच्यासाठी शेवटची संधी ठरणार आहे. कारण त्याने या हंगामात भरपूर धावा केल्या तरच त्याला संघात संधी मिळवता येईल. मात्र त्याला या हंगामात धावा करता न आल्यास त्याची भारतीय संघातील पुनरागमनाची संधी संपुष्टात येईल.
रणजी करंडक २०२२-२३ मध्ये मुंबईसोबत सध्याचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव जोडला जाणार असल्याने संघ आणखी मजबूत झाला आहे. रहाणेकडे मुंबई संघाचे नेतृत्व करताना संघाला यश मिळवून देण्याची चांगली संधी असणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण त्यांना मध्य प्रदेशकडून पराभव पत्करावा लागला होता.