सोनभद्र, चांदौली, (उत्तर प्रदेश) – कॉंग्रेसच्या प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांकडून जात आणि धर्माच्या आधारावर समाजामध्ये फूट पाडली जात आहे. यामुळे महागाई आणि बेरोजगारीसारख्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांनी केला आहे.
नागरिकांच्या समस्या सोडवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र मोकाट जनावरांचा प्रश्न उत्तर प्रदेशच्या सरकारच्या तुकीच्या धोरणांमुलेच निर्माण झाला आहे, अशी टीकाही प्रियंका गांधींनी केली. सोनभद्र येथील निवडणूक प्रचार सभेमध्ये त्या बोलत होत्या.
पुढील पाच वर्षांसाठी जनतेचे प्रश्न सोडवणारे सरकार सत्तेवर आणण्यासाठीच निवडणूका होत असतात. मात्र भाजप, बसपा आणि सपा सारख्या राजकीय प7ांकडून समाजामध्ये जात आणि धर्माच्या आदारावर फूट पाडली जात आहे. यामुळे नागरिकांसमोरिल महागाई, बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या मुद्यांकडे दुर्लक्ष होते आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.
कॉंग्रेसच्या सरकारने आदिवासींना वनजमिनींच्या मालकीचा हक्क दिला. मात्र आता बुलडोझरने त्यांना हुसकावून लावले जाते आहे, असा आरोप करताना प्रियंका गांधींनी 2019 मध्ये झालेल्या उंभा हत्याकांडाची आठवण करून दिली. या हत्याकांडात 11 आदिवासींची हत्या करण्यात आली होती.