मुंबई – जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना पदावरून हटवण्याची मागणी होत आहे. मात्र, भारतीय संघाने यंदा होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तरच शास्त्रींचे पद वाचेल, असे संकेत बीसीसीआयकडून मिळत आहेत.
शास्त्री त्यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघाने आयसीसीची कोणतीही स्पर्धा आतापर्यंत जिंकलेली नाही. मात्र, जर संघाने टी-20 विश्वकरंडक जिंकला तरच शास्त्रींचे पद कायम राहील अन्यथा ते पुन्हा एकदा समालोचक म्हणून काम करताना दिसतील.
टी-20 विश्वकरंडक शास्त्री आणि संघासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यानंतर संघात बदल झाल्याचे पाहायला मिळेल. जर भारताने विश्वकरंडक जिंकला तरच प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.