संतोष पवार
सातारा – सातारा जिल्ह्यात सुमारे एक हजार 501 ग्रामपंचायती असून या ग्रामपंचायतीचा कारभार फक्त एक हजार ग्रामसेवक सांभाळत आहेत. अनेक ग्रामसेवकांकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा कारभार सोपवण्यात आल्याने विकास कामांना ब्रेक मिळत आहे. अतिरिक्त कामामुळे ग्रामसेवक व ग्रामस्थांमध्ये विविध कारणावरुन खडांजगी होत आहे.
सरकार आणि ग्रामस्थ यांच्यातील दुवा म्हणून ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आपली भूमिका बजावत असतो. गावात विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे ही महत्वाची कामे ग्रामसेवक करतो. शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर जनजागृती करुन गावचा कारभार सरपंच व सदस्यांच्या नेतृत्वाखाली सांभाळण्याची महत्वाची जबाबदारी ग्रामसेवकाकडे असते. मात्र, गेली कित्येक वर्षे ग्रामसेवकांची संख्या आहे तीच आहे. जिल्ह्यात सरासरी दीड ग्रामपंचायतीचा कारभार एका ग्रामसेवकाकडे येत आहे.
जिल्ह्यातील 778 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवक आणि 170 गामपंचायतींमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतींचा पदभार आहे त्यांना नागरिकांना दाखले देणे, घरकुलांसह विविध प्रस्तावांची पूर्तता करण्यात त्यांना अडचणी येत आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विभुते निलंबित त्यावेळी मृताच्या नातेवाइकांनी आटपाडी पोलीस ठाण्यात आणि बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथे विभुते यांच्या घरासमोर ठिय्या मारला होता. या घटनेमुळे सांगली व सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
दुर्गम भागातील ग्रामस्थ हैराण
कांदाटी खोरे, पाटण, जावळी, महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागात अनेक ठिकाणी ग्रामसेवकांकडे दोन- दोन ग्रामपंचायतींचा पदभार देण्यात आला आहे. दुर्गम भाग असल्याने दळणवळणाच्या साधनांचा अभाव असल्याने अनेक गावात ग्रामसेवकांचे दर्शन दुर्मिळ होत आहे. ज्यादिवशी ग्रामसेवक गावात जात आहेत त्यादिवशी याच मुद्द्यावरुन ग्रामस्थ व ग्रामसेवकांमध्ये वादावादी होत आहे. कामाच्या वाढत्या ताणामुळे ग्रामसेवक ग्रामस्थांना गतीने सेवा पुरवू शकत नाही. त्यामुळे ग्रामीण ग्रामस्थांची गैरसोय होत आहे.