100 रुपयांने विक्री : ग्राहकांचा हात आखडता
उरुळी कांचन- उरुळी कांचन येथील दररोज भरणाऱ्या बाजारात कांद्याचा बाजारभाव 100 किलो झाल्याने बाजारात कुठेही कांदा विक्री झाली नाही. येथे दररोज चार वाजता बाजार भरतो. 10 ते 12 गावांतील शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, सोमवारी (दि.25) बाजारात भेंडी, फ्लॉवर, कारले, टोमॅटो विक्रीसाठी आणण्यात आली होती. कुलदैवत जेजुरीचा खंडोबा यांची पंचाष्टीसाठी 6 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे जेजुरीची सट कशी साजरी करणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दर रविवारी आठवडे बाजारात कमी प्रमाणात कांदा विक्रीसाठी आला होता.
किरकोळ कांद्याचा बाजारभाव 100 रुपये झाल्याने काही ग्राहकांनी 40 रुपये किलोचा कांदा घेतला. त्यामुळे महागाईचा तडका ग्राहकांना बसत आहे. दररोज भरणाऱ्या बाजारात कांदा महागल्याने ग्राहक टोमॅटो, भेंडी, काकडी घेत होते. वडेवाले भीमराव गायकवाड म्हणाले की, कांदा महाग झाल्याने आम्ही ग्राहकांना काकडी व कोबी खाण्यासाठी देतो. वडापाव खाण्यासाठी ग्राहकांना कांदे देण्यासाठी परवडत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.