Vijay Vadettiwar On Eknath Shinde| पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांची जुन्या सेवेतील कामात अनियमितता, सहकार्यांना त्रास देणे अशी प्रकरणे काढून त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यानंतर निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आरोग्य मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच मी मागासवर्गीय असल्यामुळेच माझ्यावर जाणूनबुजून निलंबनाची कारवाई केली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.
निलंबनानंतर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या भ्रष्ट कामगिरीची पोलखोल केली आहे. भगवान पवार यांच्या लेटर बॉम्बनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले आहे.आता याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक पत्र ट्विट करुन राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट
“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड – प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप! महायुती सरकार मध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही त्यांचा महायुतीतील मुजोर आणि भ्रष्ट मंत्री कसा छळ करतात त्याचा मोठा पुरावा समोर आला आहे”, असे वडेट्टीवार यांनी म्हंटले आहे. Vijay Vadettiwar On Eknath Shinde|
“पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ.भगवान पवार यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निलंबन मागे घ्यावे म्हणून पत्र लिहिले आहे. मंत्र्यांनी त्यांना बोलवून वारंवार नियमबाह्य काम करण्यासाठी दबाव टाकला, ते काम केले नाही म्हणून निलंबनाची कारवाई केली गेली याबाबत अनेक खुलासे करून मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.” Vijay Vadettiwar On Eknath Shinde|
भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड – प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप!
महायुती सरकार मध्ये फक्त टेंडर काढण्याची स्पर्धा असते. जे भ्रष्ट अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाने नियमबाह्य काम करतात त्यांचे पूर्ण लाड पुरवले जातात. जे नियमबाह्य काम करत नाही… pic.twitter.com/ZkgMOJNuiD
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 26, 2024
“आरोग्य खाते हे लोकांच्या आयुष्याशी निगडित आहे, अँब्युलन्स घोटाळा पासून अनेक विषयांवर आम्ही सरकारकडे जाब विचारला पण सरकार तिथे कारवाई करत नाही. प्रामाणिक अधिकारी या भ्रष्ट सरकारचा खरा चेहरा जाणते समोर आणत आहेत.”
या पत्राची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मंत्रीमंडळातील भ्रष्ट मंत्र्यांच्या टेंडर साठी प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी देऊ नये. तीस वर्ष प्रामाणिक सेवा देणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांवर स्वतःच्या न्यायासाठी पत्र लिहायची वेळ यावी ही घटना साक्ष देणारी आहे की राज्यात भ्रष्टाचारी सरकार आणि मंत्र्यांनी पापाचा कळस गाठला आहे, असे म्हणत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा:
“4 जूननंतर संजय राऊत यांचं थोबाड फुटलेलं…” ; भाजप नेत्याची सडकून टीका