काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रविवारी हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस पक्षाचे संपर्क केंद्र असलेल्या नाहान येथील सभेला संबोधित केले.
यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या काही विशिष्ट व्यावसायिकांशी असलेल्या संबंधांवरून निशाणा साधला. काँग्रेसचे सरकार आल्यास देशातील प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेच्या खात्यात दरमहा 8500 रुपये दिले जातील, असे ते म्हणाले.
#WATCH | Himachal Pradesh: Congress MP Rahul Gandhi says, “…A list will be prepared of the poor people in the country…From every poor family, a woman’s name will be selected…On 5th July, Rs 8,500 will be credited to the bank accounts of crores of poor women in the… pic.twitter.com/HJiEPLr7IG
— ANI (@ANI) May 26, 2024
रॅलीत आलेल्या लोकांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, “देशातील सर्व गरीब लोकांची यादी तयार केली जाईल. हे आमचे पहिले काम असेल. प्रत्येक गरीब कुटुंबातून एका महिलेचे नाव निवडले जाईल. या यादीत शेतकरी, मजूर आणि बेरोजगार तरुणांच्या कुटुंबांचा समावेश असेल. 5 जुलै रोजी तुम्हाला करोडो महिलांच्या बँक खात्यात 8500 रुपये जमा होतील.’
दर महिन्याच्या 5 तारखेला हे पैसे महिलांच्या खात्यात ठका-ठक, ठका-ठक, ठका-ठक येतील, असे ते म्हणाले. राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी तुम्हाला आत्ता सांगत आहे की जेव्हा हे घडेल तेव्हा हे सर्व प्रेस लोक म्हणतील की भारत सरकार गरिबांच्या बँक खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करून त्यांच्या सवयी बिघडवत आहे. मी म्हणेन की जर तुम्ही अधिक बोललात तर आम्ही ते दुप्पट करू.” असेही ते म्हणाले आहे .