मुंबई – राज्यात देशात भाजपाची लाट आहे. अशातच काँगेसच्या तिकिटावर सलग तिसऱ्यांदा संग्राम थोपटे निवडून आले. पुणे जिल्ह्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात एक अतिशय महत्वाचे आमदार म्हणून संग्राम थोपटे यांच्याकडे पहिले जाते. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. मात्र काँग्रेसमध्ये त्यांना त्यांच्या कार्याचे फळ मिळालेले दिसत नाही. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवसांपासून सुरू आहे.
त्यात आता काँग्रेसमधील जवळपास 20 आमदार थेट पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे गाऱ्हाणे मांडणार आहेत. या आमदारांचं नेतृत्व भोरचे आमदार संग्राम थोपटे करत आहेत. त्यांच्याच लेटरहेडवर सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आमदार थोपटे यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मागील काही महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र अद्याप निवड झालेली नाही. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून हे पदाची निवडणूक झालेली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढत चालली आहे.
या आमदारांची आहेत सह्या
1. अमित झनक (रिसोड)
2. हिरामण खोसकर (इगतपुरी)
3. विक्रमसिंह सावंत (जत)
4. संजय जगताप (पुरंदर)
5. कुणाल पाटील (धुळे ग्रामीण)
6. शिरीष चौधरी (रावेर)
7. प्रतिभा धानोरकर (वरोरा)
8. प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य)
9. राजु पारवे (उमरेड)
10. शिरीषकुमार नाईक (नवापूर)
11. कैलाश गौरंट्याल (जालना)
12. अमिन पटेल (मुंबादेवी)
13. राजू आवळे (हातकणंगले)
14. पी. एन. पाटील (करवीर)
15. सहसराम कोरोटे (आमगाव)
16. बळवंत वानखेडे (दर्यापूर)
17. लहू कानडे (श्रीरामपूर)
18. विकास ठाकरे (नागपूर पश्चिम)
19. मोहन हंबर्डे (नांदेड दक्षिण)
20. सुलभा खोडके (अमरावती)