chhagan bhujbal मराठा समाजातर्फे ओबीसी समाजावर अन्याय करण्यात येत असल्याचा आरोप करत भुजबळ यांनी पीडितांची यादीच वाचून दाखवली. यावेळी त्यांनी नाभिक समाजाच्या एका व्यक्तीने ओबीसी एल्गार मोर्चाला पाठिंबा दिल्याने, मराठा समाजाकडून त्याच्या दुकानावर बहिष्कार घालण्यात आल्याचे सांगितले.
‘मराठा समाज बहिष्कार घालत असल्यास न्हावी समाजाने देखील मराठा समाजाच्या एकाही व्यक्तीची हजामत करू नये’ असं जाहीर आवाहनच भुजबळ यांनी मंचावरून यावेळी केलं. यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
माध्यमांशी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले,’भुजबळ यांचे विचार खालच्या दर्जाचे आहे. गोरगरीब जनता उपाशी राहावी, ही त्यांची इच्छा दिसते. मग ते स्वजातीय असोत किंवा मराठा समाजाचे असोत. त्यांच्या विचारांना आम्ही सुधारू शकत नाहीत. जे गरीब नाभिक आपला व्यवसाय करतात, त्यांनाही आता व्यवसाय करू द्यायचा नाही, असे भुजबळांचे स्वप्न दिसते.’ अस म्हणत त्यांनी भुजबळांवर खोचक टीका केली.