सातारा, (प्रतिनिधी) – भारतीय रिझर्व्ह बँक राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्याकडील आदेशानुसार ‘आपल्या ग्राहकांना ओळखा’ निकषांची पूर्तता करणे सर्व खातेदारांना बंधनकारक आहे. ज्या खातेदारांनी केवायसी कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही. त्यांनी त्यांचे खाते असलेल्या या बॅंकेच्या संबंधित शाखेत समक्ष हजर राहून केवायसी निकषांची पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केवायसीसाठी ओळखीबाबत सत्यता पडताळून घेण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसेन्स, निवडणुकीचे ओळखपत्र, कामाचे ठिकाणचे ओळखपत्र, विद्यार्थी ओळखपत्र, शासकीय ओळखपत्र, नरेगा जॉब कार्ड इत्यादीपैकी कोणत्याही दस्तऐवजाची झेरॉक्स प्रत . रहिवासी असल्याबाबत सत्यता पडताळून घेण्यासाठी आधारकार्ड, लाईटबिल, शासकीय कर बिल, ड्रायव्हिंग लायसेन्स, निवडणुक ओळखपत्र, पासपोर्ट, रहिवासी करारनामा, नरेगा जॉब कार्ड,सार्वजनिक प्राधिका-यांचा दाखला इत्यादीपैकी कोणत्याही एका दस्तऐवजाची झेरॉक्स.
बॅंकिंग व्यवहार करण्यासाठी केवायसी ग्राहकांच्या हिताची असल्याने सर्व खातेदारांनी संबंधित शाखेत जावून आवश्यक कागदपत्रांची दि. २९ पर्यंत पूर्तता करुन सहकार्य करावे. भारत सरकार व आयकर विभाग यांनी कळविल्यानुसार विविध प्रकारच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
ज्या खात्यावर गत पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी शिल्लक बाकी शून्य आहे व जे खातेदार केवायसी कागदपत्रांची पूर्तता केली नाही तर त्यांची खाती दि. १/०३/२०२४ पासून बंद करण्यात येणार आहेत. ज्या ग्राहकांना नव्याने बचत ठेव खाते उघडावयाचे असेल त्या ग्राहकांना केवायसी कागदपत्रांची पूर्तता करुन नवीन बचत ठेव खाते उघडता येईल.