ऊर्से, (वार्ताहर) – पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर उर्से टोलनाक्याजवळ बुधवारी (दि. २१) कार पुढे जाणाऱ्या कंटेनरवर जोरात धडकली. या भीषण अपघातात तळेगाव दाभाडे येथील एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले.
सुनील श्रीपती थोरात (६१, रा. तळेगाव दाभाडे) आणि मयुरी विशाल सोनवणे (२५, रा. कोंढवा, पुणे) हे दोघे जागीच ठार झाले. तर अक्षय सुनील थोरात (२७), दत्तात्रेय श्रीपती थोरात (६०), शारदा सुनील थोरात (४८), तेजल अक्षय थोरात (२५) आणि राजवीर थोरात (३ वर्षे) अशी गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील थोरात हे त्यांचा पुतण्याच्या अंत्यविधीसाठी कुटुंबासह मोटारगाडीने (एमएच १४ एलब ४६४०) मुंबई येथे मंगळवारी रात्री गेले होते. तेथून तळेगावला परत येतान बुधवारी (दि. २१) सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुनील थोरात हे गाडी चालवत होते