मुंबई – ४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र टिव्ही वाहिन्यांनी हा प्रश्न सोडवला आहे. लोकांची मागणी बघून अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू करण्यात आले.
Prabhu hum bewakoof evam swaarthi logon ko maaf karna ,humko aapki aur aapka serial dekhne ki yaad bhi tab aai jab ek epidemic aaya, warna hum toh happily Big boss aur roadies mei doobey thay 🤷🏻♀️
— Kavita (@Iamkavitak) April 3, 2020
लॉकडाउन काळात अनेकांना घरात बसून काय करावे असा प्रश्न पडला होता.अशातच सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ पुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली.आता अभिनेत्रीने रामायण पुन्हा दाखवण्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले होते.कविता कौशिकने ट्विट केले आहे की,‘तुम्ही संसदेत बसून मोबाइलवर पॉर्न पाहता आणि आम्हाला रामायण पाहण्यास सांगता’ असे कविताने ट्विट केले होते. या ट्विटनंतर मात्र या रामायण मालिकेला उद्देशून अभिनेत्री सरीता कौशीकने ट्वीट केले आहे.
दरम्यान, कविता कौशिक गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत येत आहे. कवीता कौशीकने ट्वीटमध्ये म्हटले आहे की,’हे देवा आम्हा मुर्ख आणि स्वार्थी लोकांना माफ कर. ज्यावेळी आमच्यावर संकट कोसळलं त्यावेळी आम्हाला तुझी आठवण आली आणि आम्ही तुझ्या मालिका पाहू लागलो. नाहीतर आम्ही कायम ‘बिग बॉस’ आणि ‘रोडीज’ हेच शो पाहण्यात दंग असतो’, असं ट्विट कविताने केलं आहे.