मुंबई : लॉकडाऊनमुळे एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या २४ एप्रिलला विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होणार आहेत.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. या आगोदर राज्य सरकरने स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुका देखील पुढे ढकलल्या आहेत. दरम्यान महराष्ट्रात कोरोनाचे ४७ रुग्ण आढळले असून,कोरोना बाधितांची रुग्ण संख्या ५३७ वर पोहचली आहे.