घाबरण्याची गरज नाही; धर्माच्या आधारावर नोंदणीची तरतूद नाही
नवी दिल्ली : आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी)जशी राबवली तशी देशभर राबवण्यात येईल. मात्र त्यासाठी कोणत्याही धर्माने घाबरून जाण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी स्पष्ट केले. राज्यसभेत शहा मार्गदर्शन करत होते.
शहा म्हणाले, एनआरसीमध्ये अमुक एका धर्माला वगळावे, अशी कोणतीही तरतूद त्यात नाही. धर्म वगळून देशाचे नागरिक म्हणून एनआरसीमध्ये नोंदणी करण्यता येईल. एनआरसीही नागरिकत्व सुधारणा विधेयकापेक्षा वेगळे आहे.
एनआरसीची अंतिम यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात येईल. सुमारे 19 लाख जण राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीतून वगळले आहेत.
ज्यांची नावे वगळण्यात आली आहेत, अशा व्यक्ती आसामध्ये उभी करण्यात आलेल्या प्रादकरणाकडे दाद मागूसकतात. ज्यांना वकीलाकडे जाणे परवडणारे नाही, त्यांना आसाम सरकारच्या वतीने मदत करण्यात येईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.
उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड यासारख्या भाजपाची सरकार असणाऱ्या राज्यांनी आसामप्रमाणे एनआरसी करण्याची मागणी या पुर्वी केली आहे.