नवी दिल्ली : सरकारी मालकीची विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)ला नॉन-परफॉर्मिंग ऐसेटचा (एनपीए) फटका बसला आहे. कंपनीचा एनपीए पाच वर्षांत दुप्पट झाला आहे.
एलआयसीकडे असलेल्या रोख ठेवीवर जोखीम वाढत आहे. याबाबत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही बुधवारी ट्विट करून याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, कोट्यवधी प्रामाणिक लोक एलआयसीमध्ये गुंतवणूक करतात, कारण त्यांचा त्यावर विश्वास आहे. मोदी सरकार एलआयसीचे नुकसान करून जनतेचा विश्वास नष्ट करीत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
Crores of honest people invest in LIC because they trust it.
The Modi Govt is risking their future by damaging LIC & destroying the trust the public has in it.
These short sighted actions create panic & can have catastrophic consequences. https://t.co/F0dmk5t5uB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 22, 2020
रोकड साठ्यामुळे एलआयसी सरकारसाठी संकटमोचन म्हणून काम करते आहे. एलआयसीने सार्वजनिक कंपन्या आणि बँकांचे समभाग खरेदी करुन त्यांचे संरक्षण केले आहे. पण एलआयसीच्या ताज्या आकडेवारीनुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2019-20 च्या पहिल्या सहा महिन्यांत (एप्रिल ते सप्टेंबर) एलआयसीचा एनपीए 6.10% वाढला आहे.
एलआयसीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत एकूण 30000 कोटी रुपयांचा एकूण एनपीए आहे. अहवालानुसार सप्टेंबर 2019 मध्ये कंपनीचा एकूण एनपीए 6.10 टक्के होता. जो गेल्या पाच वर्षांतील जवळपास दुप्पट एनपीए आहे. हा एनपीए खासगी क्षेत्राच्या येस बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस बँक यांच्याजवळ आहे.
2019-20 च्या दुसर्या तिमाहीमध्ये येस बँकेचा सकल एनपीए 7.39 टक्के, आयसीआयसीआयचा एनपीए 6.37 टक्के तर अॅक्सिस बँकेचा एनपीए 5.03 टक्क्यांपर्यंत पोहोचला राहवे.