मुंबई ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यभर दौरा करत आहेत. जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारत त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप ठाकरे गट आणि स्वत: सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना आपलं मत मांडलं आहे.
जयंत पाटील म्हणाले,’सुषमा अंधारे यांना जळगाव येथे नजर कैदेत ठेवण्यात आले. यावरून व्यक्तिस्वातंत्र्यावर किती गदा आली आहे हे स्पष्ट होते. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीने तो दिला आहे. एखाद्याने काय बोलायचे हा त्यांचा प्रश्न आहे तसेच ऐकणाऱ्यांनी काय ऐकायचे हे देखील त्यांचे ते ठरवतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला बोलून न देणे हे व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आहे.’ असेही ते म्हणाले आहे.
पहा व्हिडिओ