कोलकाता – विराट कोहलीशी माझे कोणतेही वाद नाहीत, असा खुलासा कर्णधार रोहित शर्मा याने केला आहे. माध्यमांमध्ये कोणत्या बातम्या छापून येतात हे महत्त्वाचे नसून आमच्यातील संबंध कसे आहेत ते आम्हाला माहीत आहे व तेच जास्त महत्त्वाचे आहे, असेही रोहित म्हणाला.
आमच्यात काहीतरी वाद आहेत अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने येत आहेत. मात्र, त्यावर काही मत व्यक्त करावे असे आम्हाला दोघांनाही वाटत नव्हते, पण अजून यावर माध्यमांना चर्चा करावी लागू नये याकरताच हे सांगत आहे, असेही रोहितने सांगितले.