Nitin Gadkari । निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या काल तारखा जाहीर केल्या. यासोबतच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झालीय. त्यामुळे आता राजकीय पक्षांची मॅरेथॉन शर्यत सुरू झाली. अनेक राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत. तर काहींची घोषणा होणे बाकी आहे. भारतीय जनता पक्षाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राच्या नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिले आहे.
दरम्यान, पक्षाने कोणत्या अहवालाच्या आधारे त्यांना नागपूरचे उमेदवार केले, याविषयीचा खुलासा खुद्द नितीन गडकरींनी केलाय.एका हिंदी वृत्त वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी, “आमचा पक्ष लोकशाहीवादी पक्ष आहे. नेता कितीही मोठा असला तरी लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात जाऊन अहवाल तयार करतात. निरीक्षकही आमच्या ठिकाणी आले आणि त्यांनी केंद्रीय नेतृत्वाला अहवाल दिला.
‘माझे नाव आणि काम जनतेला माहिती ‘ Nitin Gadkari ।
पुढे बोलताना त्यांनी, “मी १० वर्षे नागपूरचा खासदार आहे. मी जनतेला दिलेली आश्वासने मी पूर्ण केली आहेत, जनतेला माझे नाव आणि काम माहित आहे. मी जनतेचे आशीर्वाद घेणार, असे ठरवले. मी घरोघरी जाऊन जनतेचे आशीर्वाद घेईन. मी केलेल्या कामाचा हिशेब जनतेला देईन. मी कोणताही भेदभाव करून काम केले नाही. ज्यांनी मला मत दिले त्यांच्यासाठी आणि ज्यांनी मला मत दिले नाही त्यांच्यासाठीही मी काम केले.
भाजपच्या 370 पेक्षा जास्त जागांवर गडकरी काय म्हणाले? Nitin Gadkari ।
भाजपच्या 370 पेक्षा जास्त जागांवर नितीन गडकरी म्हणाले, “मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाचा जनतेला खूप फायदा झालाय. जे काँग्रेस 60 ते 65 वर्षात करू शकले नाही ते आम्ही 10 वर्षात केले आहे. जनता आम्हाला नक्कीच साथ देईल. महाराष्ट्रातही आमच्या सरकारने चांगले काम केले आहे. महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय होईल.”असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का
‘अमित शाह, नितिन गडकरी, राजनाथ सिंह, कमलनाथ’ VIP सीटवर मतदान केव्हा आणि कधी होणार ? वाचा एका क्लीकवर