मुंबई – काल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे आमदार नितेश राणे यांना टोला लगावत ‘टिल्ल्या’ असा शब्दप्रयोग केला होता. एका पत्रकाराने पवार यांना नितेश राणे शरद पवारांबाबतचा एक प्रश्न विचारला होता. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,”टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही. त्यांची उंची किती, त्यांची झेप किती… त्यांना मी कशाला उत्तर देऊ.” आता या टोलेबाजीनंतर नितेश राणे यांची याबाबतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नितेश राणे यांनी एक ट्विट करत अजित पवार यांच्या टोजेबाजीला उत्तर दिल आहे. आपल्या ट्विटमध्ये राणे म्हणतात,”लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.”
लघूशंकेनी धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीरयष्टीवरून भाष्य केले यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली व हे सिद्ध झाले की यांना ‘औरंग्यावरची ‘ टिका सहन होत नाही म्हणूनच यांचे काका छत्रपती शिवाजी महारांजाच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही.@AjitPawarSpeaks
— nitesh rane (@NiteshNRane) January 5, 2023
काय म्हणाले होते नेमकं अजित पवार
शरद पवार कधीही शिवाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करत नाहीत,ते आजवर कधीही रायगडावर गेलेलं नाहीत. अशी टीका राणे यांनी केली होती याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली होती. त्यावर बोलताना पवार म्हणाले,”टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण नाही,त्यांची उंची किती.. त्यांची झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ,माझे बाकीचे प्रवक्ते वेगैरे देतील उत्तर. असल्याच्या नादी मी लागत नसतो असं स्पष्ट अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केलं होत.