मुंबई – एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. याचवेळी त्यांनी औरंगजेब यांच्या कबरीचेही दर्शन घेतले. या घटनेनंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील सत्ताधारी नेत्यांसह विरोधी पक्षांतील नेतेही यावरुन टीका करत आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनीही या भेटीवरुन अकबरुद्दीन ओवेसींना थेट इशारा देत राज्य सरकारवर जहरी टीका केली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून टीका केली आहे.
या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की,
मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्या मध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व!! pic.twitter.com/FB7pVSOraE
— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
नितेश राणे म्हणाले, “या कारट्या ओवेसी ला माहीत आहे की, मी औरंगजेबाच्या थडग्यासमोर नागडा नाचलो तरी मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल. कारण, राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”, याला म्हणतात यांचे खरे हिंदुत्व !, अशा प्रखर शब्दात नितेश राणेंनी राज्य सरकारवर जहरी टिका केली आहे. तसेच, मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर…आम्ही शिवरायांचे मावळे नाही !, असा इशाराही राणेंनी ट्विटरवरुन दिला आहे.
मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा..
याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..
आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!— nitesh rane (@NiteshNRane) May 13, 2022
मनसेच्या दिलीप धोत्रेंचाही कडक शब्दात इशारा
दिलीप धोत्रे यांनी ओवेसींना अत्यंत कडक आणि खालच्या भाषेत उत्तर दिले आहे. ज्या संभाजीराजेंना आम्ही दैवत मानतो, त्यांचे हाल करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहून अकबरुद्दीन ओवेसी याने आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आता, त्याचे थडगे देखील औरंगजेबाच्या थडग्या शेजारी बांधल्याशिवाय राहणार नाही असा इशाराच दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. तसेच अकबरुद्दीन ओवेसी याच्या अंगात पाकिस्तानाच रक्त असल्याची टीका देखील धोत्रे यांनी केली आहे.
दरम्यान, इम्तियाज जलील यांनी नमूद केले की, दरगाहवर जाणे आणि तेथे जाऊन ‘दरूद शरीफ’ पडणे ही आमची संस्कृती आहे. ओवेसी यांनी जाणीवपूर्वक औरंगजेब यांच्याच कबरीवर पुष्प अर्पण केले नाही, तर या भागातील विविध थोर सुफींच्या दरगाहमध्ये जाऊन चादर-पुष्प अर्पण केले. विरोधकांनी याचे राजकारण करू नये असेही ते म्हणाले.