रायगड – महाड येथील रेपोली गावाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर पहाटे पावणेचारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचे शव माणगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.
मृतांमध्ये 5 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलगीचा समावेश आहे. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव येथील रेपोली गावाजवळ घडला. ट्रक व ईको कारची धडक झाली. खेड येथील लोटे एमआयडीसीमधून निघलेला ट्रकने रेपोली गावाजवळ एका चारचाकी वाहनाला जोराची धडक दिली. या कारमधील प्रवासी गुहागर येथील हेदवी गावाकडे जात होते. पहाटे पावणेचारच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक व कारची धडक इतकी भीषण होती की पहाटेच्या अंधारात झालेल्या या अपघतात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात चार वर्षांच्या चिमुकला जखमी झाला आहे.
त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर मृतांचे शव माणगाव जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अपघातामुळे स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीत ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक दिल्याची माहिती आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास अपघात झाल्याने तूर्त तरी या घटनेचा प्रत्यक्षदर्शी समोर आलेला नाही. त्यामुळे अपघाताचे नेमके कारण कळू शकलेले नाही. तपासाअंती अपघाताचे कारण समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.