मुंबई : ‘बेस्ट’ बसच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डचे लोकार्पण काल मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान मुख्यत्र्यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मात्र त्यांच्या या टीकेला आता भाजप नेते निलेश राणे यांनी उत्तर दिले आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी,‘काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे? आपण काय बोलतोय? कसं बोलतोय? हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला’, अशी खोचक टीका राणेंनी केली आहे. तसेच विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही, असा टोलाही यातून राणे यांनी लगावला आहे.
काल मुख्यमंत्री BEST आयोजित नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड कार्यक्रमाला गेले आणि राजकीय बोलून निघाले. कार्यक्रम काय आहे आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे भान नसलेला महाराष्ट्राला पहिला मुख्यमंत्री मिळाला. विरोधकांवर टीका करण्यासाठी व्यासपीठ राजकीय असावं हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 26, 2022
दरम्यान, काल हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘ताळतंत्र थोडसं सोडायला काय हरकत आहे. म्हणे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. हिंदुत्व म्हणजे धोतर आहे का?बाबरी पडली तेव्हा तुम्ही बिळात लपला होतात.
आम्हाला हिंदुत्व शिकवत आहात तर तुमचे हिंदुत्व आहे कुठे?.’ तसेच घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी गदाधारी हिंदुत्ववाल्यांना शिकवू नये,आमचे हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.