पुणे – गुंड निलेश घायवळ हा जामिनावर सुटल्यावर त्याने नगर जिल्ह्यात समाजकार्य करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
पुणे पोलिसांची भीती आणि सातत्याने होत असलेल्या तडिपारीमुळे निलेश घायवळने आपला मोर्चा नगर जिल्ह्यात हलवला आहे. तो तेथूनच टोळीची सूत्रे हलवित आहे.
गजा मारणे, शरद मोहोळ, निलेश घायवळ असे गुन्हेगारीतील बडे प्रस्थ सध्या जामिन किंवा केस निकाली निघाल्याने बाहेर आहेत.
एकेकाळी एकमेकाचे प्रतिस्पर्धी असलेले हे गुन्हेगार बाहेर सुटल्याने पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी टोळ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे.