मुंबई – एकनाथ खडसे आणि संजय राउत यांच्या पत्नीला ईडीने पाठविलेल्या नोटीसीमुळे राज्यातील राजकारण तापलेले आहे. शिवसेनेच्या नेत्यांना आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. तर दुसरीकडे आपल्या कवितेमुळे भल्याभल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटवणारे सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ईडीच्या नोटीसीवर भन्नाट कविता केली आहे.
रामदार आठवले हे शिर्डी दौऱ्यावर आले होते. पत्रकारांशी बोलत असताना आठवले यांना तुम्हाला ईडीची नोटीस आली का? असा सवाल विचारला असता आठवलेंनी एक भन्नाट कविता सादर केली.
‘माझ्याकडे कधी ईडी येणार नाही.
जरी ईडीची नोटीस मला आली तर मी “गो करोना गो’ म्हणून तिला मागे पाठवले. तसा माझा आणि ईडीचा काही संबंध नाही. मुळात मी पित नाही बिडी, मग माझ्या मागे का लागेल ईडी?’ असे आठवले यांनी म्हणताच एकच हशा पिकला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा भाजपासोबत यावे. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजपसोबत येण्याची गरज असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या सोबत शिवसेनेने जाणे योग्य नाही. तुम्हाला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेईन, असे म्हणत आठवले यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा ऑफर दिली आहे.