श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात शनिवारी बस उलटल्याने बिहारमधील चार जण ठार आणि 28 जखमी झाले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील बार्सू भागात श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.
जखमींपैकी 23 जणांना उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आणि जिल्हा प्रशासनाला बाधित लोकांना आवश्यक ती सर्व मदत देण्याचे निर्देश दिले. जिल्हा प्रशासन बिहारमधील शोकग्रस्त कुटुंबीयांच्या संपर्कात असून त्यांना सर्वतोपरी मदत पुरवली जात आहे.
अपघातातील मृतांची ओळख पटली आहे. त्यांच्या मूळ गावातील नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला असून त्यांना मृतदेह गावी घेऊन जाण्याबाबत प्रशासनातील अधिकारी मदत करीत आहेत.