ठाणे – नाशिकमधील दिंडोरी ते मुंबई या शेतकऱ्यांच्या पायी लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेल्या 58 वर्षीय शेतकऱ्याचा शुक्रवारी रात्री ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे मृत्यू झाला. दिंडोरीजवळील गावातील रहिवासी असलेले पुंडलिक जाधव यांना शुक्रवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना शहापूर येथील रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेण्यास होत असलेल्या दिरंगाईसाठी मुळेच हा प्रकार घडला आहे असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे प्रदेश सरचिटणीस अजित नवले केला असून याबाबत त्यांनी सरकारला जबाबदार धरले आहे. सरकारच्या धोरणामुळेच आम्हा शेतकऱ्यांना आजही शहापूरमध्ये बसावे लागत आहे. मृत शेतकऱ्याच्या नातेवाईकांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
17 कलमी मागण्यांच्या सनदीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी गेल्या रविवारी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मोर्चा काढला होता आणि 200 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठणार होता. कांद्याला किमान आधारभूत किंमत मिळावी, शेतीमालाला योग्य भाव द्यावा, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीची जलद भरपाई करावी आणि वनजमिनीचे हक्क या मागण्यांचा त्यात समावेश आहे.
बुधवारी राज्यमंत्री दादा भुसे आणि अतुल सावे यांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. बुधवारी पत्रकारांशी बोलताना दादा भुसे म्हणाले, “आम्ही 14 मुद्द्यांवर चर्चा केली. आम्ही त्यांची भूमिका मान्य केली आणि त्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या. आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे.