मुंबई – बोगस टीआरपी प्रकरणात मुंबई पोलिसांनी मंगळवारी आरोपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या गुन्हे वार्ता विभागाने हे आरोपपत्र दाखल केले असून यात 12 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात रिपब्लिक टिव्हीच्या पशिम प्रदेश वितरण प्रमुखाचा समावेश आहे.
ब्रॉडकास्ट ऑडिअन्स रिसर्च कौन्सिलने हंस रिसर्च ग्रुप यांच्या तर्फे याबाबतची फिर्याद दाखल केली होती. टीआरपी नंबरमध्ये काही वाहीन्या हेराफेरी करत असल्याचे त्यात म्हटले होते. वाहिन्यांचे उत्पन्नाचे मुख्य साधन असणाऱ्या वाहिन्यांसाठी टीआरपी हा महत्वाचा असतो.
मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी गेल्या महिन्यात रिपब्लिकन टिव्हीसह दोन मराठी बॉक्स सिनेमानंद आणि फक्त मराठी या वाहिन्या टीआरपीत बनावटगिरी करत असल्याचा दावा केला होता.रिपब्लिक टिव्हीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायणस्वामी आणि वरीष्ठ कार्यकारी संपादक अभिषेक कपूर यांचे जबाब गेल्या महिन्यात नोंदवून घेतले होते.
या प्रकरणात अज्ञात वहिन्यांविरोधात उत्तर प्रदेशात गुन्हा नोंदवल्यानंतर त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. त्यानंतर राज्य सरकारने सीबीआयची तपासाची परवानगी काढून घेतली होती.