नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाचा जलवा सगळ्या इंडस्ट्रीने एन्जॉय केला. रिऍलिटी शो च्या या दोन्ही जजना मंचावर एकत्र आल्यावर याच मंचावर आपला जीवनसाथीही मिळाला आहे. या दोघांचे लग्न ठरले आहे. नेहाचा माजी बॉयफ्रेंड हिमांश कोहलीने प्रथमच या संदर्भात तोंड उघडले आहे.
किमान वर्षभरापूर्वी नेहा आणि हिमांश रिलेशनशीपमध्ये होते, पण अल्पावधीतच त्यांचा ब्रेक अप झाला, पण अजूनही हिमांशला “नेहा कक्कडचा बॉयफ्रेंड’म्हणूनच ओळखतात. त्याची आपली स्वतःची काही खास ओळख आहे. हिमांश एका टीव्ही सिरीयल आणि एका सिनेमामध्येही चमकला होता. त्यानंतर “रांची डायरीज’ सिनेमाच्या निमित्ताने त्याची आणि नेहाची ओळख झाली. या सिनेमासाठी नेहाने गाणे गायले होते.
नेहाबरोबर ब्रेक अप झाल्यावर सगळ्या मीडियाने आपल्यालाच दोष दिला. नेहा एका कार्यक्रमात शुटिंगच्यावेळी रडली. त्यामुळे तिला सहानुभूती मिळाली आणि आपली प्रतिमा व्हिलनसारखीच केली गेली, अशी तक्रारच हिमांशने व्यक्त केली. गायक उदित नारायणचा मुलगा आदित्यबरोबर तिचे लग्न ठरले आहे. याबाबत लोक जेव्हा प्रतिक्रिया विचारतात, तेव्हा आपल्याकडे एखाद्या व्हिलनकडे बघावे, तसे बघत असतात, असे त्याने सांगितले.