मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर खड्डे का पडत नाहीत? पुष्कर श्रोत्री
मुंबई- पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली असून, रस्त्यांवरील खड्डे नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. सध्या चाळण झालेल्या या रस्त्यांवरून वाट काढण्यासाठी सामान्य जनतेबरोबरच मराठी कलाकारांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार सोशल मीडियाद्वारे यावर व्यक्त होत आहेत. आता अभिनेता ‘अभिजित चव्हाण’ने देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत या विषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, यापूर्वी देखील अभिनेता सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर, पुष्कर श्रोत्री, अशोक सराफ आणि जितेंद्र जोशी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यांची सध्याची परिस्थिती कथन केली आहे.