मुंबई – एकनाथ शिंदेंना धनुष्यबाणच कशाला…? जादूटोणा करून मुख्यमंत्री बनलेल्यांना “उलटी काळी बाहुली”…! “टाचण्या टोचून कुंकूवाचा लिंबू”…! असे अनेक चिन्ह लाभदायक ठरतील…! जे चिन्ह “बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच आहे” ते घेण्याचा नाहीतर गोठवण्याचा “अघोरी प्रयत्न म्हणजे कुटील कारस्थान”.! असं म्हणत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी ट्विटरव्दारे शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
आमची शिवसेना म्हणण्यापेक्षा “शिंदेसेना” नाव देऊन स्वतःच कर्तृत्व सिद्ध करा…! म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास निर्माण करण्याची संधी तुम्हाला आहे…! असं देखील प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे.
पुढे विद्या चव्हाण यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहेत . भाजप नेते नितेश राणे आणि निलेश राणे हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर सातत्याने टिका करीत आहेत. त्यांचा देखील चव्हाण यांनी समाचार घेतला आहे.
“जळावू पणाचा कहर” म्याँव-म्याँव म्हणणाऱ्यांची, “कर्कश” कोल्हे कुई कोल्ह्यांना कळत नाही…! पण, महाराष्ट्र ऐकतो…! “लबाड कोल्हांच” कारस्थान लक्षातही ठेवतो, योग्य वेळ येताच दणका दाखवतो…! अंस देखील त्यांनी म्हटलं आहे.