नवी दिल्ली – सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची द्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फिरवली होती. पण या 2022 या वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी शेतकऱ्यांच्या यातनाच दुप्पट झाल्या आहेत, अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी केली आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या एका संदेशात म्हटले आहे की, “देशात सध्या प्रधानमंत्री शेतकरी छळ योजना सुरू आहे. आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालीच नाही, देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारीच सरकारने ठेवलेली नाही, सरकारने त्यांच्या मित्रांचे कर्ज माफ केले पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेच नाही. शेतकऱ्यांना योग्य किमान हमी भाव मिळेल, असे आश्वासन दिले गेले पण ते आश्वासनही खोटे ठरले आहे. पीक विमा योजना काढली पण त्यात शेतकऱ्यांऐवजी विमा कंपन्यांनीच चाळीस हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे”, असा घणाघातही राहुल गांधी यांनी केला आहे.
“मोदी सरकार 2022 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होते पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या यातनाच दुप्पट झाल्या आहेत”, असे ते म्हणाले. हे सरकार सातत्याने केवळ त्यांच्या भांडवलदार मित्रांसाठीच काम करीत असल्याचा आरोपही त्यांच्याकडून सतत केला जात आहे.
खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, “राम सेतुची लव्ह स्टोरी ताज महालपेक्षाही जुनी”