मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे फसवे सरकार आहे. सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे. अशी जळजळीत टीका भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. महावितरणने कृषीपंपाचा वीजपुरवठा खंडित करून गेली काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सक्तीची वीज बिल वसुली सुरु केली आहे. वीज तोडणी मोहिमेमुळे पाण्याअभावी शेती पिके जळून चालली आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने तात्काळ आदेश देऊन कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत सुरू करावा. अशी मागणी ही त्यांनी केली, या टीकेवर आता राज्याचे राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना नाव न घेता खोचक सल्ला दिलाय.
“महाविकास आघाडी फसवे सरकार’, हर्षवर्धन पाटलांची जळजळीत टीका
आज इंदापूर तालुक्यातील कोरोना परिस्थितीची आढावा बैठक माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कश्या पद्धतीने उपाययोजना राबवल्या पाहिजेत ह्याबद्दल सखोल चर्चा झाली.@supriya_sule pic.twitter.com/ZjmHVpXuGg— Dattatray Bharane (@bharanemamaNCP) March 13, 2021
नेमकं काय म्हणाले दत्तात्रय भरणे
“माझ्या नसानसात काम आहे. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देणार नाही. विरोधकांनी शांतच बसावे,” असं म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांना लक्ष्य केलं.
ते पुढे म्हणाले,’इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी माझे उद्दिष्ट खूप मोठे आहे. येणाऱ्या 4 वर्षांच्या काळात मी इंदापूर तालुक्यासाठी विकासाचा महापूर आणणार आहे. मी तालुक्याच्या पाण्याची काळजी घेतली आहे. माझ्या नसानसात काम आहे. विरोधकांच्या टीकेकडे मी लक्ष देणार नाही. विरोधकांनी शांतच बसावे. विरोधकांना माझी विनंती एवढीच आहे की चांगल्या कामाचे स्वागत करा आणि आपल्या हातून काही होत नसेल तर आपण विश्रांती घ्या.’