मुंबई – संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या दीडशे एकर जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे उघड झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत.
संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत. pic.twitter.com/5I8XZuFFOW
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 20, 2021
याबाबत आता विरोधी पक्षाकडून टीका केली जात असून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी नवाब मलिक यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
त्यांनी ट्विट केले आहे की,’संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना उस्मानाबाद जिल्ह्यात मंत्री नवाब मलिक यांच्या मालकीच्या जमिनीवर रात्रीच्या अंधारात शेळी आणि बोकडांचा बाजार भरत असल्याचे समोर आले आहे. रोज सकाळी उठून मोदी सरकारला सल्ला देणाऱ्या नवाब मलिकांना हे काळोखातले बोकड धंदे शोभत नाहीत.’ असं म्हणत त्यांनी मालिकांवर टीका केली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
उस्मानाबाद तालुक्यातील जवळा दुमाला येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास कोरोनाचे नियम डावलून शेळी आणि बोकडाचा बाजार भरत असल्याचा प्रकार उघड झाला. हा बाजार मागील तीन ते चार आठवड्यापासून भरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले . बाजारात शेकडो विक्रेते, खरेदीदार, शेळ्या, मेंढ्या, बोकडे तसेच 50 ते 70 च्या जवळपास छोटी, मोठी वाहने जिल्ह्यातील तसेच पर जिल्ह्यातून येत रात्रीच्या अंधारात येत होती. तिथे हा बाजार भरवला जात होता.
याबाबत करोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासन करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवीत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, बोकडांच्या बाजारामुळे खळबळ उडाली आहे. उस्मानाबाद भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.