लोकशाहीचा आत्मा जिवंत ठेवण्यासाठी आणि त्याला बळकटी आणण्यासाठी कोण कोणत्या गोष्टी अंमलात आणता येतील, हे तपासणे गरजेचे आहे. पण प्रश्न पडतो तो निवडून येणाऱ्या आमदारांना प्रबोधन केल्यास कितपत या गोष्टी साध्य होतील, हे ही पडताळणे गरजेचे आहे. अशा वेळेस एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात देशात प्रथमच पहिल्या राष्ट्रीय विधायक संमेलनाचे आयोजन नुकतेच मुंबईत यशस्वीपणे संपन्न झाले.
दोन हजार आमदारांची उपस्थिती ही म्हणजेच देशातील अर्ध्यापेक्षा अधिक जनतेचे प्रतिनिधित्व येथे उपस्थित होते. संमेलनाच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्र विधिमंडळ आणि विधानपरिषदेने अभिनंदनाचा ठराव पारित करून राहुल कराड यांना शुभेच्छा दिल्या. राहुल कराड यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा आढावा घेता देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करावा, अशी प्रांजळ इच्छा आहे.
सर्व सामान्य जनतेचा राजकारणातील सहभाग कमी होत आहे. परंतू वस्तुस्थिती ही आहे की लोकशाहीला ते अत्यंत घातक व मारक आहे. यामुळे देशातील आमदारांना नवचेतना व प्रेरणा मिळावी या उद्देशाने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या नेतृत्वात देशात प्रथमच सुवर्ण अक्षरांनी लिहिणारा न भूतो न भविष्यती असे पहिले राष्ट्रीय विधायक संमेलन नुकतेच देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे संपन्न झाले. 2 हजार आमदारांनी उत्साहाने यात सहभाग घेतला. या संमेलनाची किर्ती ही देशातील काना कोपऱ्यात पोहचल्यानंतर 2024 साली गोवा राज्यात या संमेलनाचे आयोजन होणार आहे.
त्यानंतर कर्नाटक राज्यात देशभरातील आमदार एकत्रित येऊन लोकशाहीच्या बळकटीसाठी विचार मंथन करतील. मुंबई येथील संमेलनाच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेने अभिनंदनाचा ठराव पारित करून राहुल कराड यांना शुभेच्छा दिल्या. राहुल कराड यांनी केलेल्या अलौकिक कार्याचा आढावा घेता देशातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करावा. देशाच्या विकासात राज्यांचा मोलाचा वाटा असतो. हे लक्षात घेऊन देशातील 28 पेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशामधील आमदारांसाठी हे संमेलन भरविण्यात आले होते.
उद्घाटनाला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, लोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. देशातील विविध राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषदांचे अध्यक्ष, सभापती, 80 मंत्री आणि तब्बल दोन हजारांहून अधिक आमदार या संमेलनाला उपस्थित होते. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह आदींच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा समारोप झाला.
– रामहरी कराड (रुईकर),पुणे.