पदाची बिरुदावली चिटकावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या पदामुळे जनतेचा हिरमोड
राजेंद्र वाघमारे
नेवासा – मराठी भाषेतील वाक्यात प्रथम नावाचा नव्हे तर पदाचा वापर केला जातो “नावात काय आहे?”असे शेक्सपियर म्हणून गेले पण पदापेक्षा आपल्या कर्तबगारीमुळे नावांतच खरा दम असल्याचे वेळोवेळी विविध क्षेञातील हरहुन्नेरी व्यक्तीमत्वाने आपल्या स्वकर्त्तृत्वाच्या कामगिरीतून सिद्ध करुन दाखविलेले आहे.
माञ याला आता राजकारणाचा आखाडाच अपवाद ठरतांना दिसून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राजकारणात केवळ आपले गॉडफादर नावाला ‘पद’ देवून दिलेल्या पदाचा निर्णय घेण्याची कुवत आणि क्षमता या पदाधिकाऱ्याला असतांनाही निर्णय घेण्याचा एक कवडीचाही अधिकार माञ त्याला देत नसल्यामुळे राजकिय – सामाजिक – आणि सहकार खात्याच्या क्षेञातील दिले गेलेल्या या पदामुळे सध्या अनेक रथी-महारथींचे नांवच सध्या राजकिय आखाड्यात बदनाम होत चालल्याचे दिसून येत अाहे
नेवासा तालुक्यातील या राजकिय फडात पद असतांनाही माञ पदसिद्ध व्यक्तीला या पदाचा ‘पावर’च ‘गुल’ केल्यामुळे हे पद केवळ शोभेचे वास्तू बनल्यामुळे “मुन्नी बदनाम हुई,डॉर्लिंग तेरे लियें”अशीच म्हणण्याची केविलवाणी वेळ या पद नामामुळे पदाधिकाऱ्यांवर येवून ठेपली आहे.त्यामुळे ‘नांव मोठे लक्षण खोटे’ असल्याचा साक्षात्कार अनेक पदाधिकाऱ्यांना पद असतांनाही त्या पदाचा माञ ‘पावर’ नसल्यामुळे होतांना दिसून येत असल्यामुळे नांवात काय जादू आहे हे पद असूनही साध्य करता येत नसल्यामुळे दिसून येत आहे.
त्यामुळे ‘पद’ हे केवळ शोभेची वास्तू बनल्याचे चिञ राजकिय आखाड्यात पदाची बिरुदावली चिटकावून बसलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे सर्वसामान्य जनतेला दिसून येत आहे पदाच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावर असतांनाही या पदाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याची बौद्धिक क्षमता असूनही निर्णय घेता येत नसल्यामुळे राजकारणातील पदाधिकारी केवळ नामधारी बनल्याचे सर्वसामान्य जनतेतून सध्या बोलले जात आहे.त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा ‘पावर’ केवळ पद देवून केला असला तरी प्रत्याक्षात कारवाई आणि कृती करण्यासाठी नसल्यामुळे पदाची ‘खुर्ची’ केवळ नावालाच उभी असल्याची टिका सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.
नावात काय आहे?”असे शेक्सपियर म्हणून गेले… पण नावातच खर कर्त्तृत्व आहे माञ ते साध्य केले तरच नावात खरा ‘पावर’ असतो माञ राजकिय आखाड्यात या पदाच्या पदाधिकाऱ्यांना पदाचा पावर नसल्यामुळे हा पावरच गुल झाल्यामुळे ‘नांव मोठे लक्षण खोटे’ असल्याचा साक्षात्कार जनतेला येतांना दिसून येत आहे.