नवी दिल्ली – आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेच्या केंद्रस्थानी राहणारी अभिनेत्री कंगना रणावतची प्रतिमा भारतीय जनता पार्टीच कट्टर समर्थक अशी झाली आहे. मध्यंतरी कंगनाला भाजपकडून मथुरा या हेमा मालिनी प्रतिनिधीत्व करत असलेल्या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिल जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र आपले भाजप प्रेम का आहे यावर कंगनाने एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.
कंगना म्हणते की 2014 पूर्वी आपले कुटुंब कट्टर कॉंग्रेसी होते. मात्र 2014 नंतर आम्ही राजकीय दृष्ट्या कनव्हर्ट झालो आहोत. आता माझे वडील रोज सकाळी जय मोदी म्हणतात तर रोज संध्याकाळ जय योगी म्हणतात. एका राजकीय कुटुंबाशी माझा संबंध आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी आलेत आणि अचानक एक मोठा बदल झाला आहे.
माझ्या वडीलांनीच पहिल्यांदा मला मोदी आणि त्यांच्या कामाबद्दल माहीती दिली. त्यानंतर आमचे सगळे कुटुंबच राजकीय दृष्ट्या बदलले. संपूर्ण देशाला जागे करण्यासाठ केवळ एकच व्यक्ती पुरेसा असतो. आपल्या देशाला बऱ्याच काळापासून अशा कणखर नेतृत्वाची गरज होती. ज्या प्रकारे मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत त्याच प्रकारे काम करण्याची गरज होती.