मुंबई : येत्या काही दिवसांवर आलेल्या दिवाळी सणानिमित्त रोषणाई करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ठिकठिकाणी फटाक्यांचे स्टॉल देखील लागले आहेत. मात्र फटाक्यांमुळे हवा प्रदूषणाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली आहे. वायु प्रदूषणामुळे कोट्यवधी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आली आहे. या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने कठोर निर्बंध लागू केले आहे.
त्यानुसार आता मुंबईकरांना सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेतच फटाके वाजवण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली व फटाक्यांबाबतची वेळ ठरवून देण्यात आली. या निर्देशांचे पालन होण्याबाबतची जबाबदारी सर्व महापालिकांमधील प्रत्येक प्रभागांच्या सहायक आयुक्तांकडे सोपवण्यात आली. त्याचबरोबर सहायक आयुक्तांकडून काटेकोर अंमलबजावणीकडे सर्व आयुक्तांनी नजर ठेवण्यास सांगितले. तसेच नियमांचे पालन न झाल्यास कारवाईचे निर्देश दिले.
याशिवाय उच्च न्यायालयाने शहरातील वायू प्रदूषणाच्या पातळीची स्वतःहून दखल घेत, हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उद्देशाने काही दिवस शहरातील सर्व बांधकामे थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असं उच्च न्यायालयाने सुनावले. यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या विनंतीनंतर बांधकाम बंदीबाबत न्यायालयाने प्रशासनाला अखेरची संधी दिली. मात्र संधी देताना चार दिवसात शुक्रवारपर्यंत (10 नोव्हेंबर) हवेची गुणवत्ता चांगली न झाल्यास बांधकामावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला जाईल, असा अल्टिमेटमही महानगरपालिकेला देण्यात आला.
साधारण ऑक्टोबर ते मार्च दरम्यान दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरू, लखनऊ व पाटणा या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली दिसते. प्रदूषणातील धुलीकणामुळे हृदयाचे विविध आजार, हृदयविकार व श्वसनाच्या अन्य आजारांना बळी पडू शकतात.
दिल्लीत दोन दिवस शाळा बंद