IAS Inspirational Story: नेहमी असे म्हंटले जाते कि एक परीक्षा फेल झाले तर ते कुठल्याही व्यक्तीचे भविष्य ठरवू शकत नाही, अशीच काहीशी मन देशातील अधिकारी बनलेल्या काहींच्या आयुष्यात परफेक्ट लागू होते, देशातील UPSC परीक्षा ही सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आयएएस बनतात. आयएएस बनणे हे वाटते तितके सोपे नाही. पण असे काही जण आहे जे कोणी दहावी तर कोणी बारावीमध्ये नापास झाले असून सुद्धा आज अधिकारी बनले आहे.
भारतात असे काही आयएएस अधिकारी आहेत जे अयशस्वी होऊनही इतक्या मोठ्या उंचीवर पोहोचले आहेत. यामध्ये आयएएस अंजू शर्मासारख्या अनेकांच्या नावांचा समावेश आहे. या IAS बद्दल सविस्तर जाणून घेऊया.
IAS अंजू शर्माने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, ती 10वीच्या प्री-बोर्डमध्ये नापास झाली होती. इतकंच नाही तर 12वी दरम्यान तिला पुन्हा त्याच गोष्टीला सामोरे जावे लागले. मात्र, नंतर अंजु परीक्षा उत्तीर्ण झाली. या घटनेतून शिकत IAS अंजू शर्मा यांनी कठोर परिश्रम करून पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. यावेळी तिच्या आईने तिला साथ दिली.
आयएएस रुक्मणी रियार
आयएएस रुक्मणी रियार राजस्थानमध्ये कलेक्टर आहेत. त्या पंजाबमधील चंदीगडच्या आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये ती सहावीत नापास झाल्याचे सांगण्यात आले आहे. पण असे असतानाही UPSC परीक्षेत दुसरा क्रमांक मिळवून एवढे मोठे यश मिळवले आहे.
महाराष्ट्र केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी मनोज शर्मा हे इतर कोणत्याही वर्गात नव्हे तर बारावीत नापास झाले होते. इयत्ता 12वीत नापास होण्याव्यतिरिक्त इतर अनेक विषयात त्याला खूप कमी गुण मिळाले होते. तर हे काही आयएएस होते ज्यांची कहाणी खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की जर आपण एखादी गोष्ट करण्याचा संकल्प केला तर आपण सर्वकाही साध्य करू शकतो.