तुमच्या हातातील फोन ‘मेड इन इंडिया’ आहे हे तुम्हाला माहीत आहे का? होय, कम्युनिकेशन आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे खरे आहे. देशात वापरले जाणारे ९९ टक्के मोबाईल फोन भारतात बनवले जात असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे.
कम्युनिकेशन आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की मोबाइल उत्पादन उद्योगाचे मूल्य $44 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडले आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी टाटा समूहाच्या होसूर येथील आयफोन प्लांटला त्यांच्या पहिल्या भेटीदरम्यान ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले की, ‘आज भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादनाने १०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. केवळ संख्याच वाढली नाही तर भारत मूल्य शृंखलेतही पुढे जात आहे कारण अनेक घटक देशात बनवले जात आहेत.’
दरम्यान, टाटा समूहाने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर 2023 मध्ये तैवानचा विस्ट्रॉन प्लांट विकत घेतला होता. हा आयफोन उत्पादन प्लांट टाटाने सुमारे $125 दशलक्ष किमतीच्या डीलमध्ये खरेदी केला होता. गेल्या 9 वर्षांत आम्ही अशा पातळीवर पोहोचलो आहोत जिथे आम्ही इलेक्ट्रॉनिक्स आणि उत्पादनांमध्ये निर्यात-आधारित वाढ पाहिली आहे. या कठीण उद्योगात प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान आहे. आमच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमात बरीच प्रगती झाली आहे. चिप उत्पादन प्रकल्पाचे बांधकाम खूप चांगले सुरू आहे. काही प्रसिद्ध लोक उद्योगातील मोबाईल फोनच्या वाढीवर टीका करतात आणि त्यातून निर्माण होणारा रोजगार विसरतात.’ असेही म्हणाले आहे.