नवी दिल्ली – यावर्षी साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत उपलब्धतेसाठी साखर राखून ठेवण्यासाठी सरकारने साखर कारखान्यांना फक्त 17 लाख टन साखरेचा उपयोग इथेनॉलसाठी करण्याची परवानगी दिली आहे. आता परिस्थिती सकारात्मक झाली असून आणखी दहा ते बारा लाख टन साखर इथेनॉल निर्मितीसाठी उपलब्ध करण्याच्या शक्यतेवर सरकारने विचार करावा अशी मागणी साखर कारखान्यांच्या संघटनेने केली आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटकात साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता या अगोदर व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे 2023-24 या हंगामात केंद्र सरकारने मर्यादित प्रमाणात साखर इथेनॉलसाठी उपलब्ध केली आहे. प्राप्त माहितीनुसार 15 जानेवारीपरत साखर उत्पादन 149 लाख टन झाले. जेकी गेल्या वर्षाच्या या कालावधीच्या तुलनेत 5.28 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यानच्या काळामध्ये हवामान सुधारत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त साखर निर्माण होण्याची शक्यता स्थानिक अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. या बाबीकडे साखर कारखान्यांच्या संघटनेने लक्ष वेधले आहे. त्यामुळे या राज्यातील साखर आयुक्तांनी साखरेचे उत्पादन या अगोदर जाहीर केलेल्या अंदाजापेक्षा पाच ते दहा टक्क्यांनी जास्त होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
आमच्या अंदाजानुसारही साखरेचे उत्पादन जास्त होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीत आणखी बारा लाख टन साखर इथेनॉलसाठी उपलब्ध केली तरी देशातील गरज भागण्यासाठी ही साखर पुरेशी आहे. पुढील हंगामासाठी आणखी दोन महिन्याची साखर उपलब्ध राहू शकेल असे साखर कारखानदारांच्या संघटनेचे म्हणणे आहे. सरकारने उसापासून तयार होणार्या मळिला अधिक भाव द्यावा. त्यामुळे यामुळे इथेनॉल निर्मिती वाढण्यास मदत होईल. सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. मात्र इथेनॉल निर्मितीसाठी मक्यापेक्षा साखर जास्त उपयुक्त आहे.
जास्त कारखाने कार्यरत
गेल्या वर्षी आतापर्यंत केवळ 515 साखर कारखाने ऊस काळात करीत होते. मात्र यावर्षी सध्या 520 साखर कारखाने ऊस गाळप करीत आहे. त्यामुळे साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे. अश्या अवस्थेत अतिरिक्त साखरेचा वापर सकारात्मक कारणासाठी केला जावा असे कारखानदार म्हणतात. या महिन्याच्या शेवटी साखरेचे उत्पादन नेमके किती होईल याचा निश्चित अंदाज जाहीर करण्यात येईल असेही या संघटनेने म्हटले आहे.