नवी दिल्ली – भारतात या मान्सून हंगामात पूर्वीच्या अंदाजापेक्षा जास्त पाऊस पडेल,असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, “या मान्सून हंगामातील सरासरीच्या 103 टक्के पाऊस अपेक्षित आहे.
या आधी हवामान खात्यान देशात यंदा सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. पण हा अंदाज त्यांनी आता सुधारीत स्वरूपात सादर केला असून त्यांच्या नव्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या 103 टक्के इतका पाऊस पडेल. देशाच्या सर्वच भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे असेही मोहपात्रा यांनी सांगितले.
त्यातही मध्यभारतात यंदा सरासरीच्या 106 टक्के इतका पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान मान्सुनने केरळात आगमन केले असून त्याची पुढील वाटचाल अपेक्षेनुसार सुरू आहे असेही सांगण्यात येत आहे.