मुंबई – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार रोहित पवार यांनी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या अहिल्यादेवी जागर यात्रेचा समारोपही आज चौंडीत होणार होता मात्र चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल, तर पंतप्रधांनांची आठवण करून देऊ, महाराष्ट्र मोडेल पण दिल्लीसमोर वाकणार नाही. असं म्हणत भाजपवर टीका केली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमिवर फडणवीस आज पत्रकारांशी बोलतांना ठाकरे सरकारवर जहरी टीका केली आहे.
‘सूर्याकडे पाहून थुंकलं तर ती थुंकी स्वत:च्या तोंडावर पडते, त्यांनी सुर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार केला आहे. त्यांमुळे थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल.’ अशी टीका फडणवीसयांनी शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांच्यावर केली आहे.
दरम्यान, दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेमुळे सध्या राज्याच्या राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. दिपाली सय्यद यांनी मोदींवर आक्षेपार्ह टीका केल्यानंतर भाजपा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.