नवी दिल्ली – दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्यावेळी मोदी सरकारने शेतकऱ्यांना जी आश्वासने दिली होती ती त्यांनी पाळली नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांना योग्य किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते, शेतकऱ्यांवरील खटले मागे घेण्याचे व नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते पण शेतकऱ्यांची या बाबतीत मोदी सरकारने फसवणूकच केली आहे. अशी टीका कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे.
किसानों को गाड़ी के नीचे कुचलवाने वाली मोदी सरकार ने किसानों को
🌾 Cost+50% MSP नहीं दिया
🌾 शहीद 733 किसानों को मुआवज़ा भी नहीं दिया और
🌾 उनके ख़िलाफ़ केस भी वापस नहीं लिया
इन्हीं आश्वासन पर पिछले साल किसानों ने आज ही के दिन “किसान विजय दिवस” मनाया था! pic.twitter.com/VgpNz6d9vw
— Mallikarjun Kharge (@kharge) November 20, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतल्याच्या घोषणेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त ट्विटर संदेशात खर्गे यांनी ही टीका केली. शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची उत्पादन किंमत अधिक 50 टक्के किमान आधारभूत भाव देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही.
GPAI : जी-20 चे अध्यक्षपद मिळाल्यापाठोपाठ ‘जीपीएआय’चे अध्यक्षपदही भारताकडे
शेतकरी आंदोलनातील 733 शहीद शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही आणि त्यांच्यावरील खटलाही मागे घेतला नाही. गेल्या वर्षी मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर शेतकऱ्यांनी विजय दिवस साजरा केला होता. पण आज एक वर्षानंतरही ही आश्वासनपुर्ती अपुर्णच आहे असे खर्गे यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.