नवी दिल्ली – रविवारपासून बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने दिली आहे. चेन्नई आणि लगतच्या भागांमध्ये त्याचे वादळात रुपांतर होऊ शकते. “मोचा’ असे त्या वादळाचे नाव असून एक ते दोन दिवसात ते अधिक धोकादायक बनण्याची शक्यता आहे.
चक्रीवादळामुळे केवळ देशाच्या पूर्व भागातच पाऊस पडणार नाही. तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये पुढील 4 दिवस हवामान खराब राहू शकते. मच्छिमारांना पुढील 4 दिवस समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे.
मोचा 7 मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये प्रभाव दिसून येईल. 8 आणि 9 मे रोजी त्याची तीव्रता वाढवण्याची शक्यता आहे. यासह हवामान खात्याने मच्छिमारांना 8 मे ते 11 मे 2023 या कालावधीत समुद्रात जाऊ नये, असा सल्ला दिला आहे.