आळंदी – संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळ्या अवघ्या काही दिवसांवर आला आहे. 11 जून रोजी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. 29 जूनला आषाढी देवशयनी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला जुंपण्यात येणाऱ्या मानाच्या बैलजोडीचा मान यंदाच्या वर्षी आळंदीतील भोसले घराण्याला मिळाला आहे. भोसले कुटुंबियांनी कर्नाटक राज्यातील निपाणी तालुक्यातील राजापूर गावातून राजु गिरी यांच्याकडून 4 लाखाला ही बैलजोडी विकत घेतली आहे. तुळशीराम भोसले, रोहित भोसले यांना यंदाचा मान मिळाला आहे.
यावेळी शिवाजी रानवडे, सागर भोसले, संतोष भोसले, पांडुरंग भोसले, संजय भोसले, प्रकाशशेठ घुंडरे, तुकाराम वहिले, सादु आप्पा कुऱ्हाडे, मारुती घुंडरे, मनोजशेठ भापकर, शैलेश रानवडे, पप्पू थोरवे, प्रसाद जोशी, गणेश भोसले, सार्थक कुऱ्हाडे, चैतन्य भोर, निखिल भोसले, स्वयंम भोसले, रुद्र भोसले, तन्मय भोसले, क्षितिज भोसले, श्रेयश भोसले, निलेश घुंडरे, बाळासाहेब घुंडरे, पंडित महाराज बानूले, रुपेश खोल्लम आदी मान्यवर उपस्थित होते.