मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुरक्षेच्या कारणाने विशेष सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. याशिवाय पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पाच जूनला पक्षातील सर्व सहकाऱ्यांसोबत अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे धार्मिक तेढ किंवा इतर काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याकारणाने त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांना उत्तर प्रदेश दौऱ्या दरम्यान विशेष सुरक्षा पुरवली जाणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार राज ठाकरे यांना अधिकची सुरक्षा पुरवणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे यांन केंद्र सरकारचीही सुरक्षा देण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुत्त्वाची भूमिका घेतली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा काढला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापले आहे. यावरुन काही धार्मिक तेढ किंवा इतर काही अनुचित प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावर सुरक्षा दिली जाणार आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांना धमक्या येत असतील तर तर केंद्र सरकारच्यावतीनेही विशेष सुरक्षा दिली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.