MLA Bharat Norah । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून सहावी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये राजस्थानधील चार उमेदवारांचा समावेश आहे, तर तामिळनाडूमधील एका उमेदवाराचा समावेश आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील काही उमेदवारांची यादी जाहीर केली. असे असताना काँग्रेसला आसाममध्ये मोठा धक्का बसलाय. कारण आसामच्या लखीमपूर जिल्ह्यातील नोबोईचा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत नराह यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय.
आमदार भरत नराह यांनी आपल्या राजीनामा देत असल्याचे काल जाहीर केले. नराह यांनी आपल्या पत्नी राणी नराह यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षाकडून त्यांना तिकीट देण्यात आले नाही. तर त्यांच्या ऐवजी काँग्रेसने लखीमपूर लोकसभा मतदारसंघासाठी उदय शंकर हजारिका यांना पसंती दिली. राणी नराह या लखीमपूरमधून तीन वेळा खासदार राहिलेल्या आहेत. मात्र, तरीही राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली असल्याचं सांगण्यात येतंय.
भरत नराह सहावेळा आमदार MLA Bharat Norah ।
आमदार भरत नराह यांच्याकडे आसाम काँग्रेसच्या मीडिया सेलचे अध्यक्षपद होते. मात्र, त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या मीडिया सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर आज काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आहे. आमदार भरत नराह हे तब्बल सहा वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. भरत नराह हे त्यांच्या पत्नी राणी नराह यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झाले होते.
राणी नारा होत्या प्रबळ दावेदार MLA Bharat Norah ।
आसामच्या लखीमपूर लोकसभेसाठी राणी नराह या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. याआधी त्या या मतदारसंघातून तीन वेळा विजयी झाल्या होत्या. तसेच त्या एकवेळा राज्यसभेवरही निवडून गेल्या होत्या. याबरोबरच केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले होते.