Mirzapur 3 : पहिल्या आणि दुसऱ्या सीझननंतर आता चाहते ‘मिर्झापूर’च्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या मालिकेबाबत लोकांमध्ये वेगळीच क्रेझ आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप आवडले आहे. विशेषत: कालिन भैया, जो संपूर्ण मालिकेचा जीव मानला जातो. मिर्झापूरच्या तिसऱ्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्याचवेळी मिर्झापूर 3 बाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात खदखदत आहेत.
मुन्ना भैया जिवंत असेल की नाही? आणि कलेन भैया दहशत पसरवणार की नाही?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहेत. लवकरच ‘मिर्झापूर 3’ OTT ला धडकणार आहे. याआधीही मालिकेच्या कथेबाबत काही मोठे खुलासे झाले आहेत. । Mirzapur Season
सूत्रांच्या माहितीनुसार, कथा सीझन 3 सह पुढे नेली जाईल. यावेळी त्रिपाठी आणि पंडित कुटुंबातील भांडणातून एका नव्या कथेचा जन्म होणार आहे. मिर्झापूर 3 मध्ये शेवटच्या भागात शरदने वाचवलेला कालिन भैया, यावेळी त्याच्यात आणि गुड्डूमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
गोलूही त्याच्या कुटुंबाचा बदला घेताना दिसणार आहे. दुसऱ्या भागात मुन्ना भैय्याला गोळ्या घालून मारण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या भागात तो असणार की नाही? तर, कालिनभैय्याची पत्नी बीना तिसऱ्या सीझनमध्ये आणखीनच धमाल करणार? असे अनेक तर्कवितर्क सध्या लावले जात आहे.
दरम्यान, अश्यातच कालीन भैय्याची पत्नी बीना त्रिपाठीची व्यक्तीरेखा साकारणारी अभिनेत्री ‘रसिका दुग्गल’ने सीरिजच्या चौथ्या सीझनबद्दल चाहत्यांना हिंट दिली आहे. ‘मिर्झापूर’चा चौथा सीझन हा ‘मिर्झापूर’ मालिकेचा शेवटचा भाग असू शकतो.
रसिका दुग्गलने सांगितले की, ‘मिर्झापूर’च्या या सीरिजमधील सीझन चार हा शेवटचा ठरू शकतो. यामध्ये कालीन भैय्या आणि गुड्डू भैय्याचा खेळ खल्लास होण्याची शक्यता आहे. । Mirzapur Season
मिर्झापूर-3 मध्ये आता गुड्डू भैय्याचे वर्चस्व असणार आहे. तर, अखंडानंद त्रिपाठीदेखील जोरदार कमबॅक करणार आहे. रसिका दुग्गलच्या मते या गँगवॉरचा शेवट मिर्झापूरच्या चौथ्या सीझनमध्ये होणार आहे. आता प्रेक्षकांनी ‘मिर्झापूर 3’ पाहिल्यानंतर त्यांच्या मनात चौथ्या सीझनबद्दल उत्सुकता निर्माण होईल. असं देखील अभिनेत्री यावेळी सांगितलं.