- श्री म्हातोबा ग्रामविकास परिवर्तनची विजयी मुसंडी
हिंजवडी – जागतिक आयटीपार्कमुळे देशभर ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी ग्रामपंचायतीत सत्ताधाऱ्यांना धूळ चाखत स्थानिक सर्वपक्षीय आघाडीच्या श्री म्हातोबा ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने 17 पैकी 15 जागा जिंकून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला आहे. बिनविरोध एक वगळता सत्ताधारी पॅनेलला केवळ 1 जागा जिंकता आली. त्यामुळे सत्ताधारी म्हातोबा ग्रामविकास पॅनलला धोबीपछाड देत हिंजवडीत परिवर्तन पॅनलने मुसंडी मारली आहे.
या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या माजी सभापती कोमल सागर साखरे यांचे पती हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे व दत्ता साखरे यांची एकहाती सत्ता होती. त्याविरोधात गावातील सर्वपक्षीय गावकऱ्यांनी एकत्र येत परिवर्तन पॅनलचे 17 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी परिवर्तन पॅनेलचे 2 तर सागर साखरे गटाची एक जागा बिनविरोध झाली होती. स्वतः सागर साखरे हे प्रभाग क्रमांक 2 व 3 मधून उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
परिवर्तन पॅनेलचे विजयी उमेदवार पुढील प्रमाणे :
प्रभाग क्र. 1 – विक्रम वसंत साखरे, शिवानी अभिषेक जांभूळकर.
प्रभाग क्र. 2 – गणेश बन्सीलाल जांभूळकर, सचिन नामदेव जांभूळकर, रेखा संदीप साखरे (बिनविरोध)
प्रभाग क्र. 3 – विशाल लक्ष्मण साखरे, पल्लवी सचिन गंगावणे, प्रतीक्षा शिवाजी घोटकुले.
प्रभाग क्र. 4 – प्रदीप छबू वाघमारे, दीपाली शरद जांभूळकर (बिनविरोध).
प्रभाग क्र. 5 – शुभांगी सूरज साखरे, ऐश्वर्या प्रशांत वाघमारे
प्रभाग क्र. 6 – मच्छिंद्र बबन हुलावळे व मनीषा जयसिंग हुलावळे (विजयी), तर शिवनाथ दिगंबर जांभुळकर (बिनविरोध)
म्हतोबा ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार : प्रभाग क्रमांक 4 – आरती वैभव बेंद्रे, (बिनविरोध )
प्रभाग क्रमांक 5 : – मयूर राजेंद्र साखरे