मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं खळबळजनक वक्तव्य केले आहे. राज्यात सरकार चालले नाही तर, मध्यावधी निवडणूक होतील असं वक्तव त्यांनी केले. तसेच या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवलं.
ठाकरे सरकार किती काळ चालेल, हे डिसेंबर महिन्यात समजेल असे ते म्हणाले. चंद्रकांत पाटलाच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा चालू आहे. त्यांनी वर्तवलेले भाकीत नेमकं कशाच्या आधारावर केल असा प्रश्न विरोधकांना पडला आहे.
शिवसेनेने हिंदुत्व सोडलं नसेल तर राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) उद्धव ठाकरे सरकारने समर्थन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोणी कुणाचा विश्वासघात केला हे मध्यावधी निवडणूकातून समोर येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.